भूमिपुत्र

हिरवळीच्या खताचे फायदे

Arun Patil

हिरवळीचे खत म्हणजे वनस्पतीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे किंवा वनस्पतींच्या हिरव्या अवशेषावरून तयार झाले खत होय.

हिरवळीच्या खताचे फायदे

* हिरवळीच्या खतांमध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते. त्यामुळे मातीला काळा रंग येतो.

*  हिरवळीच्या खतामधील सेंद्रिय द्रव्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते; परिणामी जीवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांचे कार्य जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.

* लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदचे प्रमाण आणि अ‍ॅझोटोबॅक्टरसारख्या जीवाणूंचे प्रमाण वाढते.

* जमिनीत टिकून राहणार्‍या कणसमूहांचे प्रमाण वाढते.

*  जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते.

* सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून न राहता, त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीतदेखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणी धारण करण्याची क्षमता वाढते.

* हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.

* क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.

* द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.

* हिरवळीच्या खताची पिके जमिनीतील असेंद्रिय+स्फुरदाचे सेंद्रिय
स्फुरदात रूपांतर करतात आणि जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.

– अनिल विद्याधर  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT