vastu shastra 7 things not to give anyone after sunset to avoid negativity and financial loss
पुढारी ऑनलाईन : वास्तुशास्त्रातील मान्यतांनुसार सूर्यास्तानंतर काही वस्तू दुसऱ्यांना देणे टाळावे. अशा कोणत्या ७ गोष्टी आहेत आणि त्या दिल्यास काय परिणाम होऊ शकतात, याबद्दल जाणून घेऊया.
सूर्यास्तानंतर कोणाला देऊ नयेत या ७ गोष्टी
घरातील मोठी माणसं अनेकदा सांगतात की सूर्यास्तानंतर काही गोष्टी करणे टाळावे. त्यापैकीच एक म्हणजे काही विशिष्ट वस्तू दुसऱ्यांना न देणे. चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
मीठ
मीठ हे घरातील सुख-समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सूर्यास्तानंतर कोणालाही मीठ देऊ नये, अशी मान्यता आहे. असे केल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते, असे मानले जाते.
झाडू
झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सूर्यास्तानंतर झाडू कोणाला देणे अशुभ समजले जाते. यामुळे घरातील आर्थिक भरभराट आणि बरकत कमी होऊ शकते, अशी श्रद्धा आहे.
दूध
मोठी माणसं रात्री दूध देणे टाळण्याचा सल्ला देतात. दूध हे चंद्र आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. सूर्यास्तानंतर दूध दिल्यास घरातील सुख-शांतीवर परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे.
हळद
हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे हळद कोणाला द्यायची असल्यास दिवसा द्यावी, असे सांगितले जाते. सूर्यास्तानंतर हळद दिल्यास घरातील सौभाग्य कमी होऊ शकते, अशी धारणा आहे.
पैसे
अशी मान्यता आहे की सूर्यास्तानंतर कोणाला पैसे उधार दिल्यास ते परत मिळण्यास उशीर होतो. तसेच आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते, असेही मानले जाते.
कांदा आणि लसूण
कांदा आणि लसूण नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, अशी काहींची श्रद्धा आहे. त्यामुळे दिवस मावळल्यानंतर हे पदार्थ कोणाला देणे टाळावे, असे सांगितले जाते.
दही
दही हे शांती, शुभता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. सूर्यास्तानंतर दही दिल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा आणि आनंदावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे.
या लेखातील माहिती धार्मिक श्रद्धा, वास्तुशास्त्रीय मान्यता आणि लोकपरंपरांवर आधारित आहे. या दाव्यांची शास्त्रीय पुष्टी उपलब्ध नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.