Premanand Maharaj file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Premanand Maharaj: नाव आणि पैसा कमवायचा आहे? प्रेमानंद महाराजांनी सांगितले भाग्य बदलण्याचे २ उपाय

प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले यश आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे २ उपाय जाणून घ्या.

मोहन कारंडे

Premanand Maharaj

वृंदावन : आयुष्यात भरपूर नाव, पैसा आणि यश मिळावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, हे साध्य करणे तितके सोपे नसते. वृंदावनचे प्रेमानंद महाराज केवळ प्रवचनांद्वारे लोकांना मार्गदर्शनच करत नाहीत, तर यश मिळवण्याचे विविध मार्गही सांगतात.

आपल्या प्रवचनांतून महाराज भक्तांना जीवनातील सत्य गोष्टींची जाणीव करून देतात. त्यांचा असा विश्वास आहे की, जर एखाद्या व्यक्तीने काही विशिष्ट आचरण अंगीकारले, तर ती केवळ आपले नशीबच बदलू शकत नाही, तर यशाच्या अत्युच्च शिखरावरही पोहोचू शकते. प्रेमानंद महाराज यांच्या मते, ज्यांना आयुष्यात जलद गतीने यश मिळवायचे आहे, त्यांनी दोन नियमांचा अवलंब केला पाहिजे: निस्वार्थ सेवा आणि ईश्वराच्या नामाचे स्मरण.

निःस्वार्थ भावनेने सेवा करा

प्रेमानंद महाराजांच्या मते, आयुष्यात लवकर प्रगती साधायची असेल तर निःस्वार्थ भावनेने सेवा करण्याची वृत्ती अंगीकारली पाहिजे. देवाकडे प्रार्थना करताना आपल्याला इतरांची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त करावी. आई-वडील, गुरू, असहाय्य लोक, रुग्ण, प्राणी, पक्षी आणि गरजूंची सेवा निस्वार्थपणे शरीर, मन, धन आणि वाणी यांच्याद्वारे केली पाहिजे, असे ते सांगतात.

त्यांच्या मते, कोणत्याही अपेक्षेशिवाय गरजू व्यक्तीला मदत केल्याने कर्म सुधारण्यास मदत होते. पूर्वकर्मांचे परिणाम कमी होण्यासही त्याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. सनातन परंपरेतही सेवेला धर्माचा महत्त्वाचा भाग मानले गेले आहे. प्रेमानंद महाराजांच्या मते, निःस्वार्थ सेवा केल्याने व्यक्तीची भगवंताच्या मार्गावरील वाटचाल दृढ होते. त्याचबरोबर चांगल्या कर्मांची सवय लागते आणि जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होते.

भगवंताचे सतत स्मरण करा

प्रेमानंद महाराजांच्या मते, परिस्थिती कोणतीही असो, व्यक्तीने भगवानाचे स्मरण सतत करत राहावे. त्यांच्या मते, भगवंताचे नामस्मरण आणि त्याचे चिंतन हेच जीवनातील खरे धन आहे. व्यक्तीला जेव्हा भगवंताच्या नामाचे महत्त्व जाणवू लागते, तेव्हा हळूहळू सांसारिक मोह-मायेतून मन अलिप्त होण्यास सुरुवात होते. जगात कितीही पैसा, संपत्ती आणि ऐश्वर्य मिळवले तरी मृत्यूनंतर यापैकी काहीही व्यक्तीसोबत जात नाही. शेवटी आपल्या सोबत राहते ती केवळ ईश्वराची भक्ती आणि नामस्मरण, असा संदेश महाराज आपल्या प्रवचनातून देतात.

प्रेमानंद महाराजांच्या मते, जी व्यक्ती आयुष्यभर निस्वार्थ सेवा करते आणि सतत ईश्वराचे स्मरण करते, तिला कधीही दुःख, दारिद्र्य किंवा आंतरिक अशांततेचा सामना करावा लागत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती या त्रासांपासून मुक्त राहते, तेव्हा परिस्थिती तिच्या अनुकूल बनते आणि हळूहळू व्यक्ती मानसिक आणि आर्थिकदृष्ट्याही अधिक सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT