नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन
आधुनिक काळात प्रचंड यांत्रिक प्रगती झाली आहे. त्यातून माणसाचे जगणेच बदलून गेले आहे. मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या स्पर्धेचा परिणाम थेट माणसाच्या मानसिक आरोग्यावर झाला आहे. त्या मानसिक ताण-तणावातून मुक्ती मिळवत मानसिक आरोग्य जपण्यासाठी संत्रे सोला.
तणावग्रस्त असाल तर संत्र सोला हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. याच्यामागे एक शास्त्र आहे. संत्र्यात सिट्रसचा सुगंध असतो. याच्या सुगंधाने तुम्ही तणावमुक्त होण्यास मदत होते. यासोबत अनेक उपाय आहेत.
तणावमुक्त होण्यासाठी चॉकलेट हा एक उत्तम पर्याय आहे. चॉकलेट खात तुम्ही तुमच्या मनातील विचार शांत करण्याचा विचार करा आणि पाच मिनिटांसाठी का होईना मेडिटेशन करा.
डायरी लिहा. दररोज डायरी लिहिल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकतात. या मागे शास्त्र असे की डायरी लिहल्याने तुमच्या मनाचे ओझे कमी होते.
हिरव्यागार जागेत फेर फटका मारायला जा. त्यामुळे मन प्रसन्न होईल.
Be Happy…