पावसाळ्यात अनेक विषाणूंजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढते. त्यातीलच एक म्हणजे लेप्टोस्पायरॉसिस. त्यालाच वेल रोग असेही म्हणतात. गेल्या पाच वर्षांत लेप्टोस्पायरॉसिसची लागण होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. हा आजार सर्वप्रथम 2013 मध्ये भारतात आला. त्यानंतर दरवर्षी सुमारे 5 हजार लोक या विकाराने ग्रस्त होतात. त्यापैकी मृत्यू पावणार्यांचा आकडा 10 ते 15 टक्के आहे.
लेप्टोस्पायरॉसिस हा विकार जनावरांच्या मलमूत्रामध्ये असणार्या लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूंमुळे होतो. त्वचा, डोळे, कापलेली त्वचा, उघड्या जखमा आदींमधून शरीरात प्रवेश करतो. सर्वसाधारणपणे म्हशी, घोडे, शेळी, मेंढी, डुक्कर आणि कुत्रे यांच्यामुळे हा रोग पसरतो.
तीव्र ताप, डोकेदुखी, थंडी वाजून येणे, स्नायूंमध्ये वेदना, उल्ट्या, कावीळ, डोळे लाल होणे, पोटदुखी, जुलाब होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. या रोगापासून बचाव करण्यासाठी पावसाळ्यात फिरायला जाताना घाणेरड्या किंवा अस्वच्छ पाण्यात डुंबणे, फिरणे टाळावे. तसेच पावसाळ्यात एखादी जखम झाल्यास ती उघडी ठेवू नये. जास्तीत जास्त स्वच्छता बाळगावी. अँटिबॅक्टेरियल साबणाने अथवा हँडवॉशने वेळोवेळी हात स्वच्छ करावेत.