How to be Happy: नेहमी ताणतणाव आणि धावपळीच्या या जीवनात मानवी मन वारंवार अस्थिर होते. विज्ञान आणि संशोधनानुसार 'जगातील सर्वात आनंदी व्यक्ती' मानले गेलेले बौद्ध भिक्खू योंगे मिंग्युर रिम्पोचे यांनी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठीचे महत्त्वाचे आठ जीवनपाठ दिले आहेत.
मिंग्युर यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी केलेल्या चाचण्यांमध्ये आढळले की, त्यांच्या मेंदूची स्थिती ३३ वर्षांच्या व्यक्तीच्या मेंदूसारखी होती. तसेच, ते खूप मनमोकळेपणाने हसतात. मेंदूच्या स्कॅनिंगमध्ये त्यांच्यामध्ये सकारात्मक भावनांची प्रखर ऊर्जा आढळली. अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठीच्या त्यांच्या पद्धती जाणून घेण्यासाठी, जगातील सर्वात आनंदी व्यक्तीकडून मिळालेले जीवनाचे आठ महत्त्वाचे धडे जाणून घ्या.
"आज तंत्रज्ञानामुळे आपल्याकडे प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला एकटेपणा, नैराश्य किंवा कंटाळा जाणवू लागतो, तेव्हा आपण कोणत्याही उपलब्ध गोष्टीच्या मागे धावून स्वतःचा बचाव करू पाहतो," असे बौद्ध भिक्षू योन्गे मिंग्युर रिम्पोचे सांगतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही टीव्ही पाहत असतानाच मोबाईल स्क्रोल करत असाल, तर हा सिग्नल आहे की अमर्याद करमणूक कधीही समाधान देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व गोष्टी बंद करा आणि वरवरच्या गोष्टींनी आपल्यातील पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न थांबवा, हाच तो संदेश समजा.
आधुनिक जीवन म्हणजे आव्हानांची मालिका आहे. जेव्हा तुम्ही १८ वर्षांचे होतात, एखादी नवीन नोकरी सुरू करता किंवा नवीन नात्यात प्रवेश करता, तेव्हा प्रत्येक बदल हा प्रगतीची संधी देतो. एखादे नवीन आव्हान स्वीकारल्यास नवीन गोष्टींशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता वाढू शकते. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही विनाकारण रुटीन जगताय, तेव्हा प्रत्येक वेळी एक छोटा बदल करून पाहा: जसे घरी परतताना नवीन रस्ता निवडणे किंवा कधीही न वापरलेले साहित्य वापरून स्वयपाक करणे यासारख्या लहान बदलांनी सुरुवात करा.
ध्यानाबाबत मिंग्युर दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, पहिली म्हणजे, तुम्ही केव्हाही, कुठेही आणि कोणत्याही गोष्टीसह ध्यान करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या ध्यानात थोडे सर्जनशील स्वातंत्र्य असायला हवे. उदाहरणार्थ, बाहेर ट्रॅफिकचा आवाज येत असेल, तर तो आवाज तुमचे लक्ष केंद्रित करण्याचा आणि शांतता मिळवण्याचा स्रोत बनवू द्या. हे बोलण्यापेक्षा करणे कठीण आहे. गाणी ऐकून आणि नंतर मोठ्याने चालणाऱ्या संभाषणादरम्यान सराव करून याची सुरुवात करू शकता. शेवटी, ते म्हणतात की लहान मूल रडत असतानाही तुम्हाला ध्यान करता आले पाहिजे.
तिबेटी बौद्ध धर्मानुसार दृष्टिकोन, ध्यान आणि आचरण हे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत. प्रत्येकामध्ये प्रेम, करुणा आणि शहाणपणाचे गुण असतात. त्यामुळे असे म्हणणे सोपे आहे की, 'अरे, लोक चांगले नाहीत!' पण अर्थातच बऱ्याच लोकांमध्ये अनेक उत्तम गुण असतात आणि जर तुम्हाला ते दिसले, तर ते प्रत्यक्षातही उतरतात. पण ही एक सवय आहे. तुम्हाला सतत प्रयत्न करत राहावे लागेल, तरच बदल घडेल. मिंग्युर यांनी यावरही सल्ला दिला आहे. आपल्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा किंवा कार्यालयातील कटकटी सहकाऱ्याबद्दलही सकारात्मक विचार करणे ही सवय मनाला नवी दिशा देते.
जेव्हा मिन्ग्यूर यांनी आपल्या वडिलांकडून ध्यान शिकण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी वडिलांना अचानक येणारी भीती किंवा नैराश्यासोबत कसे लढावे, असा प्रश्न विचारला. "वडील म्हणाले, 'लढू नका. जर तुम्ही लढलात, तर भीती आणखी तीव्र होईल. भीतीला ढकलून दूर करण्याची गरज नाही, कारण ती आकाशातील वादळाच्या ढगासारखी असते. वादळाचा ढगामुळे आकाशाचे मूळ स्वरूप बदलत नाही, तो येतो आणि निघून जातो."
त्रासाच्या वेळी, सर्व काही ठीक होईल असे स्वतःला सांगणे कधीकधी कठीण वाटू शकते. अशा वेळी, मिन्ग्यूर शारीरिक संवेदनांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात, संकटसमयी खोलीचे तापमान किंवा सभोवतालच्या आवाजावर लक्ष केंद्रित केल्यास मन शांत होण्यास मदत होते.
लोक सहसा विचार करतात, 'मी जास्त पैसे कमावले किंवा ही नवीन नोकरी मिळवली तर मी आनंदी होईल' पण यामुळे तुमचा आनंद फक्त थोड्याच वेळासाठी बदलतो आणि तुम्ही पुन्हा पूर्वपदावर येतात. परंतु जर तुम्ही श्वासोच्छ्वास, प्रेम आणि करुणेचा सराव केला, तर तुम्ही कालांतराने तुमचा हा आनंद नक्कीच वाढवू शकता."
सुरुवात करण्यासाठी, सरळ बसा आणि नैसर्गिकरित्या श्वास घ्या, पोटाच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करा. हे करत असताना, स्वतःबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी मनातल्या मनात एखादा साधा मंत्र रिपीट करू शकता ("मी आनंदी राहो आणि सर्व दुःखांपासून मुक्त होवो" हा एक सामान्य मंत्र आहे) आणि हळूहळू ही करुणा तुमच्या आयुष्यातील इतर सर्व लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
जेव्हा तुम्हाला क्षणभर कोणावरतरी खूप राग येतो, तेव्हा १० मिनिटे ध्यान करण्याची गरज नाही; फक्त तुम्हाला राग आला आहे याची जाणीव ठेवा, जेणेकरून तुम्ही पटकन चिडण्याच्या सवयीपासून दूर राहू शकता. "आपण ज्याला जागरूकता म्हणतो ती सूर्यप्रकाशासारखी असते आणि आपल्या भावनिक सवयी या सकाळी गवतावर साचलेल्या दवबिंदू सारखे असतात. जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा दवबिंदू आपोआप विरघळतो. तिथे कोणताही संघर्ष करावा लागत नाही. फक्त रागाला ओळखा. रागासोबत राहा. एकदा तुम्ही त्याला ओळखले की रागाचे रूपांतर सकारात्मकतेत होते.
जेव्हा तुम्ही आयुष्यातील छोट्या-छोट्या आणि विशिष्ट गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आरामात बसलेल्या खूर्चीचा आनंद असो किंवा निसर्गातील सौंदर्य, प्रत्येक लहान क्षणाचे महत्त्व जाणून घेणे म्हणजेच खरे सुख आहे.