मार्च महिना सुरू होताच उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात होते. हिवाळ्याचा गारवा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा हा काळ. भारतात या काळात तापमान झपाट्याने वाढते, विशेषतः उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात पारा हळूहळू पस्तिशी चाळिशीकडे सरकू लागतो. हवेतील वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम शरीरावर होऊन विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरते.
अशरीराला या बदलाशी जुळवून घेण्यास वेळ लागती, दीर्घकाळ उन्हात राहिल्यास शरीराचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा बिघडते. त्यामुळे तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा आणि थकवा, चक्कर येणे, उलट्या होणे यांसारखे काही त्रास जाणवतात. गावर सर्वांत पहिला उपाय म्हागने पुरेसे पाणी प्यावे. गरजेनुसार ओआरएस घ्या. जाड, लोकरीच्या कपड्यांऐवजी हलके, सुती कपडे परिधान करा. शक्यतो १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा या दिवसांत घाम येण्यास सुरुवात होते. अशा वेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि डीहायड्रेशनची समस्या भेडसावू शकते. तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाईटस् संतुलन बिघडल्याने विविध समस्या उद्भवतात. तोंड आणि त्वचा कोरडी पडणे, लबबीचा रंग गडद होणे, थकवा आणि चक्कर येणे, स्नायूंमध्ये गोळे येणे आदी त्रास र होऊ शकतात. अशा वेळी पाण्यासोबत ताक, लिंबू पाष्णी, नारळ पाणी यांचा समावेश करा. उन्हात काम करताना टोपी किंवा स्कार्फ वापरा.
अतिउष्णतेमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचे त्रास वाढू शकतात भारतात झालेल्या काही संशोधनांनुसार उन्हाळ्यात ब्लड प्रेशर आणि हाय शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये वेळच्या वेळी औषधे घेणे आणि रक्तदाब, साखर तपासत राहणे आवश्यक ठरते. तसेच आहारात मीठ आणि साखर नियंत्रित प्रमाणात ठेवा. हलका व्यायाम करा. पठे, भाज्या, पचनास हलका असणारा आहार घ्या. या काळात उष्ण हवामानामुळे आर पटकन साराब होण्याची शक्यता असते आणि जीवाणूंची वाढ होते. अशा वेळी सत्यावरील खाद्यपदाथांमुळे चन्याचदा विषबाधा होऊ शकते, यामध्ये जुलाब आणि उलट्या, पोटदुखी आणि गॅसेसची समस्या, ताप आणि अंगदुखी अशा काही समस्या जाणवू शकतात. पावर उपाय म्हणजे शिळे अन्न खाणे टाळावे, स्वच्छ व योग्य प्रकारे शिजवलेले अन्न खा. घरी बनवलेले ताक आणि लिंबू पाणी या दिवसांत प्रभावी ठरते. तसेच समस्या भेडसावल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत.
उन्हाची तीब्रता वाढल्याने सनबर्न, अॅलर्जी आणि डोळ्यांचे विकार वाहण्याची शक्यता असते. 'इंडियन जर्नल ऑफ ऑप्थात्मॉलॉजी च्या अभ्यासातूनती ही बाब दिसून आली आहे. सबब डोळ्यांची व त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन आणि गॉगल्स वापरा उन्हात जाण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन किंवा अॅलोवेरा जेल लावा बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि ओलसर कापड डोळ्यांवर ठेवा.
पाखेरीज या दिवसांमध्ये काकडी, टरबूज, खरबूज यांसारख्या पाणीदार फळांचा समावेश करा. हळलेले, मसालेदार आणि जड पदार्थ टाळा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्यायाम करा. पुरेशी झोप प्या आणि थंड ठिकाणी विश्रांती प्या उष्णतेमुळे होणाच्या विकारांपासून बचावासाठी गुलकंदादी पदार्थाचे सेवन फायदेशीर ठरते.
आयआयटी दिल्लीच्या एका संशोधनानुसार उष्णतेच्या लाटांमुळे भारतात २००० ते २०२० दरम्यान १७,००० हुन अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे येणारे तीन महिने आरोग्म्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास आरोग्य सुरक्षित राहू शकते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.