Latest

kolhapur news | ‘काळम्मावाडी’त ठणठणाट! धरण कोरडे पडण्याची भीती

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरणात पाण्याचा ठणठणाट असून धरण कोरडे होण्याची भीती आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात मंगळवारी सकाळी केवळ 1.31 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. राधानगरी धरणातही 1.66 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. (kolhapur news)

काळम्मावाडी धरणाची क्षमता 25.39 टीएमसी इतकी आहे. दरवर्षी जून महिन्यात धरणात 5 ते 7 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असतो. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने 20 जून रोजी धरणात केवळ 1.31 टीएमसी इतकाच पाणीसाठा

शिल्लक राहिला आहे. येत्या काही दिवसांत तो आणखी कमी होणार आहे. पाणीसाठा कमी झाल्याने धरणाची मुख्य भिंत दिसू लागली आहे.

या धरणातून भोगावती नदीत आणि पर्यायाने पंचगंगेत गैबी बोगद्यातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, धरणात आता केवळ 5 टक्केच पाणीसाठा राहिला आहे आणि तोही मृत पाणीसाठा असल्याने त्याचा वापर अधिक प्रमाणात करता येईल, याचीही शक्यता कमी आहे. याबरोबर राधानगरीतील पाणीसाठाही 1.66 टीएमसी इतका झाला आहे. (kolhapur news)

दरम्यान मंगळवारी पत्रकारांशी बोलताना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे, पाऊसही लांबला आहे. यामुळे धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT