Latest

दिलीप वळसे-पाटील : ‘राज्यात कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवल्यास कठोर कारवाई’

backup backup

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पुढील काही दिवसात सण आहेत. यासाठी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहण्यसाठी आज बैठक पार पडली. यावर आम्ही पोलीस प्रशासनाला सज्ज राहण्यास सुचना केल्या. यावर पोलीसांकडूनही आम्ही सज्ज असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

राज्यात कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे मंत्रीमंडळाकडून आदेश देण्यात आले असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले. आज मंत्रीमंडळाची बैठक झाली. ही बैठक पोलीस अधिकारी आणि मंत्रीमंडळ यांच्यात पार पडली.

नागरिकांनी आणि राजकीय पक्षानी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य बोलू नये अशी माझी विनंती आहे. राजकीय पक्षांनी जातीभेद निर्माण होईल असे वक्तव्य केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश झालेल्या बैठकीत देण्यात आल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT