Latest

Raj Thackeray : महाराष्ट्राचा ‘सिंहासन’मधील दिगू टिपणीस झाला : राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज शिंदे-भाजप सरकारशी हातमिळवणी केली. त्यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्‍यांनी ट्विट करत राष्‍ट्रवादीमधील फूटीवर भाष्‍य केले आहे.

आज महाराष्ट्राचा 'सिंहासन'मधील  'दिगू टिपणीस' झाला…

राज ठाकरे ट्विट मध्ये म्हणतात की, . आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस' झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं

 महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असा सवाल करत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT