Latest

”मलाही असं वाटायलं लागलं की, २६/११ चा हल्ला नाना पटोलेंनीच केला”, देवेंद्र फडणवीसांचं ‘त्या’ आरोपांवर प्रत्युत्तर

अमृता चौगुले

पुणे, पुढारी ऑनलाईन: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अंबानी यांच्या अॅन्टिलिया या निवासस्थानी जी स्फोटके सापडली होती, ती देवेंद्र फडणवीसांनीच ठेवली होती, असा मोठा आरोप नाना पटोले यांनी केला. नाना पटोलेंच्या या आरोपावर गुरुवारी देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत त्यांचा खरपूस समाचार घेतला." २६/११ चा दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनी केला असं स्टेटमेंट द्यावं, अशी माझी इच्छा झाली आहे", असं फडणवीस म्हणाले. ते पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, नाना पटोलेंना पुरस्कारच द्यायला हवा. नाना पटोले म्हणाले, अंबानीच्या घरासमोर स्फोटकं मीच ठेवली. मलाही असं वाटायलं लागलं की, २६/११ चा बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला. माझा प्रश्न आहे की, वाझेला पोलीस दलात पुन्हा कुणी घेतलं? या वाझेला पोलीस दलात परत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंची माणसं माझ्याकडे आली होती. मी फाईलवर लिहिलं मी हे करणार नाही. २०१९ ला उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर वाझेला पुन्हा नोकरीत घेतलं. तो वाझे मातोश्री किंवा वर्षावर असायचा. आता परमबीर सिंगनं तुमच्यावर आरोप केले तर आमची काय चूक आहे? त्याला मुंबईचं आयुक्त उद्धव ठाकरेंनीच केलं. आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीच काढलं. वाझेच्या जबाबात आता सगळं पुढे आलंय, असं फडणवीस म्हणाले.
"..तर २६/११ चा हल्ला नाना पटोलेंनीच केला", देवेंद्र फडणवीसांचं 'त्या' आरोपांवर प्रत्युत्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT