Latest

पनवती कोण हे आता काँग्रेसला कळले असेल : उपमुख्यमंत्री फडणवीस

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले ते यश जनतेच्या मोदींवरच्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली. पनवती कोण हे काँग्रेसला कळले असेल, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवले की सरकार त्यांच्यासाठी काम करते आहे. त्याचा प्रत्यय लोकांना आल्याने भाजपचा हा अभूतपूर्व विजय साकार झाला, असे फडणवीस म्हणाले. या विजयाचे श्रेय खर्‍या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच आहे. शिवाय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह जी भाजपची टीम आहे त्या सगळ्यांचे देखील हे श्रेय आहे. या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT