निपाणी , पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी हद्दीत कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेल्या कारला अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून चालकाने कार रस्त्याच्या बाजूला उभी केल्याने कारमधील तिघे बचावले. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
ताळगाव (पणजी) येथील तन्वीर कळवेदार, दिलीप सातळकर, वैशाली सातळकर हे तिघेजण कोल्हापूर येथे उपचारासाठी गेले होते. उपचार करून परतत असताना त्यांच्या कारला यमगर्णी हद्दीत अचानक आग लागली. दरम्यान, चालकाने कार बाजूला घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांनी कारकडे धाव घेऊन आग विझवली.
घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या रुग्णवाहिकाचा भरारी पोलिस पथकाचे सहायक उपनिरीक्षक एस. आय. कंबार यांनी घटनास्थळी पाहणी केली. पुढील तपास उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांनी चालवला आहे.