बेळगाव

उचगाव : बाची रस्त्याच्या दुर्दशेमुळे प्रवासी संतप्त

दिनेश चोरगे

उचगाव; पुढारी वृत्तसेवा :  बाची ते शिनोळी रस्त्याची पुन्हा दुर्दशा झाल्याने प्रवासी त्रस्त बनले आहेत. आंदोलनाचा इशारा देताच केवळ तात्पुरती दुरुस्ती करून धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिणामी प्रवासी संतप्त बनले असून परिसरातील नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हिंडलगा ते बाची शिनोळी पर्यंतच्या रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून यातून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अनेक अपघात घडत असून वाहनांचे नुकसान होत आहे. वाहने दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंड वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची आवश्यकता आहे. यावर्षी रस्त्याची दोनदा तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. रस्त्यावर डांबरीकरण करण्याऐवजी केवळ खडी आणि माती टाकण्याचा प्रकार करण्यात आला. ही दुरुस्ती केवळ दोन दिवसात निरुपयोगी ठरली. खडी बाहेर पडून खड्डे 'जैसे थे' अवस्थेत राहत आहेत. यामुळे दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

  •  शिनोळी ते बाची दरम्यान रस्ता गायब, खड्ड्यांचे साम्राज्य
  • तुरमुरी येथे पाणी साचण्याबरोबर रस्त्याची दुर्दशा
  • उचगाव नाक्यावरील गतिरोधकाजवळ धोकादायक खड्डे
  • बेळगुंदी क्रॉस येथे धोकादायक खड्डे, रस्त्याची दुर्दशा
  • सुळगा (उ.) येथे बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर खड्डे

रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यातून पावसाळ्यात वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करण्याची गरज आहे.
– जोतिबा पाटील, प्रवासी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT