बेळगाव : गांजा सेवन करुन विविध ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. एपीएमसी व मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली. याबद्दल पोलिस आयुक्त व उपायुक्तांनी कौतुक केले आहे.
एपीएमसी पोलिसांनी अभिषेक दौलत पाटील (वय 25, रा. शिवनेरी गल्ली, शाहूनगर) व विलास शंकर बाळेकुंद्री (वय 32, रा. तानाजी गल्ली, ज्योतीनगर कंग्राळी खुर्द) यांना अटक करुन गुन्हे दाखल केले आहेत. मार्केट पोलिसांनी विजय संजय कावीलकर (वय 42, रा. समर्थनगर, बेळगाव), उत्कर्ष सुनील वर्मा (वय 21, रा. कपिलेश्वरनगर), हर्ष सुनील वर्मा (वय 21, रा. महाद्वार रोड) यांना अटक केली. या सर्वांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा करण्यात आला आहे.