गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी आहे. रोज सकाळी त्याचा जाप केल्याने सकारात्मक कंपन तरंग निर्माण होतात. जे वास्तु दोष दूर करतात.

शंखनादातून निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी नकारात्मक लहरींना दूर करतात. घरातील वातावरण निर्मळ आणि पवित्र राहते.

सकाळी शक्य तितक्या लवकर निर्माल्य देवघरातून काढावे. निर्माल्य कचऱ्याच्या डब्यात न टाकता एखाद्या झाडाखाली त्याचे विसर्जन करावे.

अंगणात कायम तुळस असावी ती बाहेरून आत येणाऱ्या नकारात्मक लहरींना रोखून धरते. तसेच तुळशी जवळ दिवा लावल्याने सर्व वास्तु दोष दूर होतात.

आपल्या घरातील झाडू कधीही लोकांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. यामुळे घरातील पैसा बाहेर जात नाही.