Virat Kohli play 2nd ODI : विराट कोहली दुसऱ्या वनडेमध्ये खेळण्याबाबत बुमराहने केला मोठा खुलासा | पुढारी

Virat Kohli play 2nd ODI : विराट कोहली दुसऱ्या वनडेमध्ये खेळण्याबाबत बुमराहने केला मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाचा (Team India) आत्मविश्वास सध्या शिखरावर पोहचला आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर गुरुवारी क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉडर्सवर खेळविण्यात येणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडला धोबीपछाड देत मालिका नावावर करण्याचा बेत टीम इंडियाने आखला आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभव करुन भारताने मालिकेत १-० ने (England India ODI Series 2022) आघाडी घेतली आहे. फक्त भारताच्या गोटात एकच चिंतेची बाब सतावत आहे, ती म्हणजे माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli play 2nd ODI) फॉर्म. मागील सामन्यात तो दुखापतीमुळे (Virat Kohli Injury)खेळू शकला नव्हता. पण, फॉर्म नसल्यामुळे त्याला खेळविण्यात न आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही हे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले. तरीही तो दुसरा एकदिवसीय सामना खेळणार की नाही यावर संदिग्धता निर्माण झाली आहे. याबाबत गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला विरचारण्यात आल्यावर विराटच्या खेळण्याबाबत त्याने मोठा खुलासा केला.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली (Virat Kohli play 2nd ODI) हा सामना खेळला नसला तरी याचा संघावर कोणताही परिणाम झालेला नाही. संघातील सर्वच खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ खेळत आहेत. भारतीय संघाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात अगदी सहजपणे विजय नोंदवला. विराट कोहली खेळला नसल्याने त्याच्या चाहत्यांकडून नकारात्मक प्रतिक्रीया येत आहे. देशातील सर्वोत्तम खेळाडूला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली जात नाही असा नकारात्मक सूर उमटू लागला आहे. तर दुसरीकडे संघातील नवोदित खेळाडुंनी चांगली कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करत आहेत. अखेरच्या टी २० सामन्यात सूर्यकुमार यादव याने शतकी खेळी करुन स्वत:चे संघातील स्थान बळकट केले आहे. तर दुसरीकडे मध्यक्रमांकाच्या फळीत आपण प्रबळ दावेदार असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. तसेच मागील दोन वर्षात संघातून बाहेर पडलेला हार्दीक पांड्या याने देखील आयपीएल नंतर स्वत:ला सिद्ध केले आहे. टी २० मालिकेत त्याने आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. त्याने फलंदाजी व गोलंदाजीने सर्वचे लक्ष पुन्हा वेधले आहे. या खेळाडुंमुळे विराट कोहली वरती दबाव वाढत असल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर बसलेल्या विराट कोहली (Virat Kohli play 2nd ODI) यांच्याबद्दल पहिल्या सामन्यातील सामनावीर ठरलेला भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विराट बाबत विचारण्यात आले. यावेळी बुमराह म्हणाला, ‘ अंतिम टी २० सामन्यात मी खेळलो नाही, तसेच विराट सुद्धा खेळला नाही. दुखापतीमुळे विराट पहिला एकदिवसीय सामना खेळू शकला नाही, पण त्याच्या सध्याच्या दुखापती बाबत मला अद्याप काय सुधारणा झाली आहे याची कल्पना नाही. तसेच या बाबत माहिती देखिल नाही.’

पुढे बोलताना बुमराह म्हणाला, विराट कोहली पुर्णपणे तंदुरुस्त असेल तर नक्कीच तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपणास खेळताना दिसेल. शिवाय तो चांगली कामगिरी देखील करेल. त्याची दुखापत किती गंभीर आहेत हे पहावे लागेल. जर दुखापत मोठी असेल तर त्याला ठिक होण्यासाठी आणखी वेळ लागेल. पण, त्याची दुखापत मोठी नसेल असे वाटते व तो निश्चित दुसऱ्या सामन्यात खेळू शकेल. तुर्तास कोणतीही अधिकृत माहिती मी देऊ शकत नाही.’

Back to top button