India vs South Africa 3rd ODI : शेवटच्या सामन्यातही भारताचा पराभव | पुढारी

India vs South Africa 3rd ODI : शेवटच्या सामन्यातही भारताचा पराभव

केपटाऊन ; पुढारी ऑनलाईन

तळामध्ये दीपक चहरने अर्धशतकाची खेळलेली झुजांर खेळी अखेर व्यर्थ ठरली. भारताने ( India vs South Africa 3rd ODI ) तिसरी एकदिवसीय मालिका ४ धावांनी गमावली. अशा पद्धतीने द.आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने जिंकत भारताला व्हाईट वॉश दिले. अगदी शेवटच्या क्षणी भारताच्या घशातील घास हिरावून भारताला धूळ चारत चार धावांनी विजय मिळवला.

द.आफिक्रेने ( India vs South Africa 3rd ODI ) दिलेले २८८ धावांचे आव्हान घेऊन भारताचे फलंदाज मैदानात उतरले. पण, भारताची सुरुवात खराब झाली. सुरुवातीलाच कर्णधार केएल राहूल बाद फक्त ९ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने डाव सावरला. शिखर धवन आणि विराट कोहली यांनी अर्धशतक करुन दोघेही मोठी खेळी करण्यापासून वंचीत राहिले. त्यानंतर आलेल्या पंतला भोपळाही फोडता आला नाही. तर पुन्हा एकदा मधल्या फळीतील श्रेयस अय्यरला देखिल मोठी खेळी करण्यात अपयश आले. सूर्यकुमार यादवने थोडाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण तो देखिल ३९ च्या धावसंख्येवर बाद झाला.

अखेर ३९ षटकात भारताने ( India vs South Africa 3rd ODI ) ६ गडी गमावून २१० धावसंख्या उभी केली होती. तेथूनच भारत पराभवाच्या छायेत येण्यास प्रारंभ झाला होता. पण, संघाच्या मदतीसाठी अष्टपैलू खेळाडू दीपक चहर धावून आला. त्याने उरलेल्यांच्या साथीने गड सर करण्याचा निश्चिय केला. पण ४३ व्या षटकात जयंत यादव अवघ्या २ धावांवर बाद झाला. एन्गीडीने त्याला बाद केले. यानंतर मैदानात जसप्रित बुमराह उतरला. चहरने बुमराच्या साथीने एक एक धाव जोडण्यास प्रारंभ केला. या खेळीत दीपक चहर याने काही मोठे फटके लगावले.

दीपक चहर आणि बुमराहच्या जोडीने भारताला विजयासमीप आणून ठेवले होते. यावेळी ४७ व्या षटकात दीपक चहर याने आपले अर्धशतक देखिल पूर्ण केले. ४७ षटकानंतर भारताची धावसंख्या ७ बाद २७८ इतकी झाली होती. भारताला जिंकण्यासाठी १८ चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. भारतासाठी विजय अगदी १० पावलांवर होता. तेव्हाच ४८ व्या एन्गीडीच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटाका मारायला जावून दीपक चहर झेल बाद झाला. अखेर चहरची झुजांर अर्धशतकी खेळी संपुष्टात आली. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ५४ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. चहर आणि बुमराह याने ८ व्या गडीसाठी ५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. ( India vs South Africa 3rd ODI )

पुढे मैदानात युजवेंद्र चहल मैदानात उतरला. बुमराह आणि चहल यांनी काही धावा जोडण्याचा प्रयत्न केला. अखेर तो देखिल ४९ व्या षटकात मोठा फटका मारताना झेल बाद झाला. त्याला फेहलुक्वायो याने बाद केले. बुमराह नंतर प्रसिद्ध कृष्णा मैदानात आला. चहल आणि कृष्णा यांच्या कडून भारताला उरली सुरली शेवटची आशा होती. ४९ वे षटक संपले तेव्हा भारतला ६ चेंडूत ६ धावांची आवश्यकता होती. गोलंदाज प्रिटोरियस यांच्या अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर कृष्णा एक धाव घेऊन स्ट्राईक चहलला दिली. आता भारताला फक्त ५ धावांची आवश्यकता होती. पुढील चेंडूवर चहलने मोठा फटका मारायची रिस्क घेतली पण चेंडू क्षेत्ररक्षक मिलर यांच्या हातात गेला आणि भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. अगदी अखेरच्या षटकात विजयाचा घास द. आफ्रिकेने भारतापासून हिरावून घेतला.

भारताकडून केएल राहूल आणि शिखर धवन यांची सलामीजोडी धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. राहूलने दोन चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. पण, पाचव्या षटकात तो स्लीप मध्ये झेल देऊन बाद झाला. अवघ्या १८ धावांवर भारताला पहिला झटका लागला. केएल राहूलने १० चेंडूत ९ धावा केल्या. पुढे शिखर धवन आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. दोघांनी मिळून ११ षटकात संघाच्या ५० धावा फलकावर लावल्या. १४ व्या षटकात दोघांनी अर्धशतकी भागिदारी रचली. दरम्यान १८ व्या षटकात शिखर धवन याने आपले अर्धशतक पूर्ण केले. शिखर धवन आणि विराट दोघांनाही लय सापडल होती. दोघेही आफ्रिकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होते. २२ षटकात दोघांनी ९८ धावांची भागिदारी रचली भारताची धावसंख्या १ बाद ११६ अशी झाली होती. तितक्यात २३ षटकात गोलंदाज आंदिले फेहलुक्वायो यांने शिखरला डिकॉककडे झेल देण्यास भाग पाडून बाद केले. शिखरने ७३ चेंडूत ६१ धावांची खेळी केली.

शिखर नंतर मागील सामन्यात मोठी खेळी करणारा ऋषभ पंत मैदानात उतरला. पण त्याने आल्या आल्या मोठा फटका मारायला जाऊन पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. भारताचा अवस्था झटक्यात १ बाद ११६ वरुन ३ बाद ११८ अशी झाली. ऋषभ नंतर श्रेयस अय्यर मैदानात उतरला. विराट आणि श्रेयस यांनी धावसंख्येत भर घालण्यास सुरुवात केली. २५ षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी स्थिरावत आहे असे वाटत असताना ३५ व्या षटकात गोलंदाज केशव महाराज याने विराट कोहलीला बाद केले. विराट कोहली याने ८४ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. पुढे सुर्यकुमार यादव याला साथीला घेऊन श्रेयसने काही धावांची भर घालण्यास सुरुवात केली. श्रेयस स्थिरावतोय असे वाटत असताना ३८ व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात श्रेयस देखिल बाद झाला. श्रेयस अय्यर याने ३४ चेंडूत २६ धावांची खेळी केली. बऱ्याचा कालावधीनंतर संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादव याने थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अखेर सूर्यकुमार देखिल मोठा फटका खेळण्याच्या नादात ४० षटकात झेल बाद झाला. त्याने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी केली.

तत्पुर्वी, India vs South Africa 3rd ODI क्विंटन डिकॉक आणि वॅन डॅर ड्यूसेन यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर द.आफ्रिकेने भारता समोर निर्धारित ५० षटकात २८८ धावांचे आव्हान दिले आहे. संपूर्ण सामन्यात डिकॉक आणि ड्युसेन यांच्या समोर ढेपाळलेल्या भारतीय गोलंदाजांना ४० व्या षटकानंतर सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. डिकॉक, ड्युसेन आणि फेहलुक्वायो यांना पाठोपाठ बाद करत भारताने खेळात पुनरागमन केले. यानंतर ठरावीक अंतरावर आफ्रिकेचे विकेट पडत राहिले. डेव्हीड मिलर याने मधल्या क्रमवारीत केलेल्या प्रतिकाराच्या जोरावर द. आफ्रिकेने सर्वबाद २८७ धावा करु शकला. अखेरच्या १० षटकात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत मोठी धावसंख्या उभा करु पाहणाऱ्या आफ्रिकेला भारताने २८७ मध्ये गुंडाळण्यात यश मिळवले.

India vs South Africa 3rd ODI पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करु न शकलेल्या तसेच दुसऱ्या सामन्यात धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ आफ्रिकेने दिलेल्या २८८ धावांचा पाठलाग करु शकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारतीय कर्णधार केएल राहूलने ( India vs South Africa 3rd ODI ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज दीपक चहर याने तिसऱ्याच षटकात जानेमन मलान याला बाद केले. किपर ऋषभ पंतकडे झेल देऊन मलान माघारी परतला. आफ्रिकेला बसलेल्या पहिल्या झटक्यानंतर क्विंटन डिकॉक याने टेम्बा बवुमा याच्या साथीने सावध सुरुवात करत स्कोरबोर्ड हालता ठेवला. या दरम्यान डिकॉकने काही मोठे फटके खेळत रनरेट कायम सहाच्या आसपास ठेवण्याचे काम केले. पण सहाव्या षटकात टेम्बा बवुमा धाव बाद झाला. यावेळी द. आफ्रिकेची अवस्था ३४ धावांत २ बाद अशी होती. मार्करम याच्या साथीने डिकॉकने आपली खेळी पुढे सुरु ठेवली. दीपक चहर याने १३ व्या षटकात जम बसवू पाहणाऱ्या मार्करमला झेल बाद केले. मार्करम याने १५ धावाची खेळी केली. यानंतर डिकॉकची साथ देण्यासाठी ड्युसेन मैदानात उतरला.

दरम्यान १८ व्या षटकात डिकॉक याने आपले अर्धशतक पूर्ण केले. डिकॉक आणि ड्युसेनने खेळपट्टीवर चांगलाच तळ ठोकला. दोन्ही फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांचा खरफूस समाचार घेतला. अखेर ३१ व्या षटकात क्विंटन डिकॉक याने आपले १७ वे एकदिवसीय शतक झळकावले. डिकॉकच्या पाठोपाठ ड्युसेन याने आपले अर्धशतक झळकावले. अखेर १४४ धावांची भागिदारी रचून डोकेदुखी ठरलेल्या डिकॉकला ३६ व्या षटकात बुमराहने बाद केले. डिकॉक शिखर धवनकडे झेल देऊन बाद झाला. त्याने आपल्या शतकी खेळीत १३० चेंडूत १२४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकारांसह २ षटकारांची आतषबाजी केली. डिकॉकच्या पाठोपाठ चहलने ड्यूसेन याला बाद केले. ड्यूसेन याने ५९ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. India vs South Africa 3rd ODI

पाठोपाठ दोन्ही जम बसलेल्या फलंदाजांना बाद करत भारताने सामन्यात पुनरागमन केले. या दोघांच्या पाठोपाठ आंदिले फेहलुक्वायो या फलंदाजाने केवळ हजेरी लावण्याचे काम केले. आंदिले फेहलुक्वायो हा धाव बाद झाला. तो केवळ ४ धावा करु शकला India vs South Africa 3rd ODI

यानंतर डेव्हीड मिलर याने खेळाची सुत्रे आपल्या हाती घेतली. परंतु त्याला अखेरच्या फलंदाजांनी फारशी साथ दिली नाही. ४८ व्या षटकात प्रिटोरियस २० धावा करुन बाद झाला. प्रसिद्ध कृष्णा याने त्याला बाद केले. पुढील ४९ व्या षटकात केशव महाराज ६ धावांवर बाद झाला. त्याला बुमराहने बाद केले. ५० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मिलर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. प्रसिद्ध कृष्णा याच्या गोलंदाजीवर विराट कोहली याने सीमारेषेवर मिलर झेल पकडला. मिलर याने ३८ चेंडू ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवाय एक चेंडू बाकी असताना प्रसिद्ध कृष्णा याने मगाला याला बाद करत आफ्रिकेचा खेळ संपवला. या खेळीत आफ्रिकेने भारतासमोर २८८ धावांचे आव्हान ठेवले. India vs South Africa 3rd ODI

मागील दोन सामन्यासारखीच तिसऱ्या सामन्यात भारताची गोलंदाजी अगदी सुमार दर्जाची राहिली. पहिल्या बारा षटकात ३ बळी घेऊन सुद्धा भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर दबाव राखता आला नाही. सर्व गोलंदाजांना क्विंटन डिकॉक आणि ड्युसेन यांनी सहज खेळून काढत चांगल्या सरासरीने धावा बनवत राहिले. डिकॉक आणि ड्युसेन यांच्या नंतर बळी मिळविण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. प्रसिद्ध कृष्णा याने ३ बळी घेतले. दीपक चहर आणि बुमराहला प्रत्येकी २ बळी घेण्यात यश आले. चहल यांने १ बळी घेतला. जयंत यादव याने १० षटक टाकले पण त्याला कोणाचाही बळी घेता आला नाही. श्रयस अय्यर याने ३ षटके टाकात सहाव्या गोलंदाजाची भूमिका बजावली परंतु त्याला देखिल यश मिळाले नाही. अखेर शेवटच्या १० षटकात भारतीय गोलंदाजांनी पाठोपाठ बळी घेत आफ्रिकेचा संपूर्ण संघ माघारी धाडला.

 

Back to top button