‘कांतारा 2’ येणार का, यावर ऋषभ शेट्टी म्हणाला… | पुढारी

‘कांतारा 2’ येणार का, यावर ऋषभ शेट्टी म्हणाला...

पुढारी ऑनलाईन : ‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अगदी अनपेक्षितरीत्या तिकीटबारीवर ‘कांतारा’ने कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यानेच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास, विवेक अर्षीहोत्री, कंगना राणावत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचे सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून कौतुक केले. आता ‘कांतारा’च्या यशानंतर त्याचा दुसरा पार्टदेखील रीलिज केला जाईल का, असा प्रश्न ऋषभ शेट्टीला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.

यावर तो म्हणाला, ‘मला याबद्दल आता काहीही सांगता येणार नाही. मी आता दोन महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. मी ज्या चित्रपटांबद्दल विचार करत होतो, ते विचार गायब झाले आहेत. त्यामुळे मी आता नव्यानं विचार करायला सुरुवात करेन.’

Back to top button