सोनाक्षी सिन्हा म्हणते, माझ्या लग्नाची नको कामाची चर्चा करा
मुंबई ; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्रींचे अफेअर, लग्न याबाबत कधी कधी नको तेवढी चर्चा होत असते. अर्थातच या सगळ्याचा अभिनेत्रींनाही त्रास होतच असतो. बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या लग्नाच्या बातम्या दररोज मीडियाच्या माध्यमातून येत असतात. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत असा खुलासा केला होता, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
सोनाक्षी सिन्हाने याबाबत आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले, ज्यावेळी माझ्याबाबत चर्चा होते त्यावेळी ती माझ्या कामाबाबतच व्हावी, असे मला नेहमीच वाटत आले आहे. मात्र, त्याऐवजी लोकांना माझ्या खासगी आयुष्यात काय घडत आहे हे जाणून घेण्याची अधिक इच्छा असते. माझ्या लग्नाबाबत मला माझे आई-वडील विचारत नसतील इतके प्रश्न लोकांकडून किंवा पत्रकारांकडून विचारले जात असतात. माझ्या आई-वडिलांना नाही इतकी काळजी त्यांना माझ्या लग्नाबाबत वाटते. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीचे नाव अभिनेता जहीर इक्बाल याच्याशी जोडले जात आहे. हे दोघे लवकरच लग्नही करणार असल्याची चर्चा आहे व त्या पार्श्वभूमीवर सोनाक्षीने हे मत व्यक्त केले आहे.
सोनाक्षी सिन्हाचे नाव सध्या झहीर इक्बालसोबत जोडले जात आहे. सोनाक्षीच्या वाढदिसाला त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता त्या व्हिडिओमध्ये सोनाक्षीला आय लव्ह यू असे म्हटले होते. त्यांच्या पोस्टवरूनच त्या दोघांच्या नात्याची चर्चा होत आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, ती लवकरच हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’ आणि ‘दहाड़” द्वारे ओटीटी प्लॅटफाॅर्मवर पदार्पण करणार आहे. यापूर्वी सोनाक्षी सिन्हा अजय देवगणसोबत भुज या चित्रपटात दिसली होती.
View this post on Instagram