सरकारी रक्कम घ्या अन् स्वावलंबी व्हा!
पुढारी वृत्तसेवा : भारताला स्वावलंबी बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी आयात कमी करून देशातच मालाचे उत्पादन वाढवण्याच्या हेतूने केंद्र सरकारने विविध क्षेत्रांमध्ये पीएलआय योजना म्हणजेच उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. या योजनेअंतर्गत निर्यात वाढवल्याबद्दल संबंधित उत्पादकांना सरकारकडून प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते.
निर्यातीत अशी झाली वाढ
इंजिनिअरिंग वस्तू 12 टक्के
औषधनिर्मिती उद्योग 4.83 टक्के
मोबाईल फोनचा धडाका
मोबाईल फोनच्या निर्मितीत भारताने आघाडी घेतली आहे. जागतिक पातळीवर 2021-22 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.15 टक्क्यांनी वाढ झाली. याच्या उलट भारतात याच वाढीचा वेग आहे तब्बल 126.11 टक्के.
- चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत 57 टक्क्यांनी वाढ.
- 2021-22 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात 1 लाख 16 हजार 894 कोटी रुपये.
- 2020-21 या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 42 टक्के अधिक
- इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादकांना आतापर्यंत प्रोत्साहनाखातर 1781 कोटी रुपये दिले.
- केंद्र सरकारकडून नव्या 314 उद्योगांना मान्यता.
- आतापर्यंत 271 उद्योगांत 31 हजार, 416 कोटी रुपयांची गुंतवणूक.