बोलणं बंद करा, काय केलं ते सांगा! वाहन कंपन्यांचा मोदी सरकारवर संताप | पुढारी

बोलणं बंद करा, काय केलं ते सांगा! वाहन कंपन्यांचा मोदी सरकारवर संताप

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : वाहन उद्योगातील दिग्गज असलेल्या मारुती सुझुकीचे प्रमुख आर.सी. भार्गव आणि टीव्हीएस मोटरचे प्रमुख वेणू श्रीनिवासन सरकारी अधिकाऱ्यांवर केवळ तोंडानेच गोष्टी होत असल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून वाहन उद्योगाची वाढ कमी होत आहे, परंतु सरकारी अधिकारी केवळ परिस्थिती सुधारण्यासाठी निवेदने देत आहेत. उद्योगाची स्थिती सुधारण्यासाठी ते काहीच करत नाहीत.

भार्गव म्हणाले, कार स्वस्त होईपर्यंत हा उद्योग वाढणार नाही

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या 61 व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना भार्गव म्हणाले की, देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र गेल्या काही वर्षांत घसरणीसह गंभीर टप्प्यावर आहे. जोपर्यंत ग्राहकांसाठी परवडणाऱ्या गाड्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतात ना पारंपारिक इंजिन वाहनांचा वेग वाढेल ना सीएनजीचा, ना जैव इंधन किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या मदतीने पुढे जाईल. भारतात अजूनही कार ही एक लक्झरी वस्तू मानली जाते, जी फक्त श्रीमंतांनाच परवडते.

दुचाकींवर 28% जास्त कर लावला जात आहे

टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वेणू श्रीनिवासन यांनी असेही म्हटले आहे की, देशात ये-जा करण्यासाठी मूलभूत वाहतूक माध्यम असलेल्या दुचाकींवरही 28 टक्के जीएसटी आकारला जात आहे. हा करांचा सर्वोच्च दर आहे आणि लक्झरी वस्तूंवर लावलेल्या कराच्या जवळपास समान आहे.
भार्गव म्हणाले की, आम्ही अशा परिस्थितीतून जात आहोत जिथे उद्योग बराच काळ घटत चालला आहे. आणि मी फक्त अमिताभ कांत (नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांचे शब्द ऐकले. सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या लोकांनी ऑटोमोबाईल उद्योगाच्या महत्त्वाविषयी निवेदने दिली आहेत. परंतु ठोस पावलांविषयी बोलणे, ज्यामुळे घसरणीचा कल थांबेल असे मी काहीही घडताना पाहिलेलं नाही.
हे ही वाचलं का?

Back to top button