नागपूर; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात राहण्यासाठी भाजप ७५ हजार पत्रे पाठविणार आहे. अमरावती शहरातून या अभियानाची प्राथमिक सुरुवात झाली आहे.
देश कितवा स्वातंत्र्य दिवस ( स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष) साजरा करतोय याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नसल्याचा आरोप भाजपने याआधी केला होता. त्यानंतर आता याचे मुख्यमंत्र्यांना स्मरण करून देण्यासाठी भाजपकडून ७५ हजार पत्रे लिहून पाठविण्यात येणार आहेत. या अभियानाची सुरूवात सध्या अमरावती शहरातून होत आहे.
- एकनाथ खडसे यांना मोठा धक्का; ५ कोटींची मालमत्ता जप्त
- राणेंची जनआशीर्वाद यात्रा कोकणात सुरु, रत्नागिरीत कडक बंदोबस्त
भारतीय जनता युवा मोर्चाने उद्धव ठाकरे यांना ही ७५ हजार पत्रे लिहिणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वादानंतर भाजप आता गांधीगिरीची पर्याय स्विकारत आहे.
- Pune Murder Mystery : प्रेयसीचा खून करून मृतदेहाची केली तीन खांडोळी
- कोण होणार करोडपती : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी-लेफ्टनंट कनिका राणे यांची एंट्री
राज्यभरातून युवा मोर्चा कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना ७५ हजार स्मरण पत्रे पाठविणार आहे अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
- कांदा : टोमॅटो पाठोपाठ कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
- जळगाव : फोर व्हिलर चोरी करणारी अट्टल दाऊद गँग जेरबंद
तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनीही ट्विट करुन भाजपच्या गांधीगिरी अभियानाविषयी माहिती दिली आहे.
हेही वाचलंत का?
- नारायण राणे- मुख्यमंत्री ठाकरे वाद : महाराष्ट्र बंगालच्या वाटेवर?
- आयएनएस विक्रांत : स्टेट ऑफ द आर्ट
- पंजाब मधील १२४ वर्षे वयाच्या महिलेचे निधन
पाहा : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय