चंद्रपूर : जादुटोणा भानामती’ मारहाण प्रकरणी तेरा आरोपी अटकेत
चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात ‘जादुटोना भानामती’ मारहाण प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत 13 आरोपींना अटक केली आहे. तर घटनेत सात जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना किरकोळ जखमींना जिवती येथेच उपचार करून सुटी देण्यात आली आहे. तर पाच जणांवर चंद्रपुरात उपचार सुरु आहे.
- Electric Car: टाटाची ‘ही’ इलेक्ट्रीक कार ६० मिनिटात होते ८० टक्के चार्ज!
- नाशिक : डॉ. वैशाली झनकर-वीर यांना ८ लाखाच्या लाच प्रकरणात जामीन
- चंद्रपुरात जादुटोणा, भानामती संशयातून एकाच कुटुंबातील ७ जणांना मारहाण
चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडी भागातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द गावात शनिवारी माणुसकीला कलंकित करणारी घटना समोर आली.
गावातील काही कुटुंब जादूटोणा करतात असा संशय नागरिकांना होता, मोहरमच्या सवारी दरम्यान काही महिलांच्या अंगात भानामती आली असल्याचा प्रकार घडला. त्यांनी गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करतात असा समज करून अन्य दलित कुटुंबातील व अन्य लोकांच्या मदतीने कसलाही विचार न करता त्या कुटुंबियातील सदस्यांना दोरखंडाने भर चौकात बांधून मारहाण केली.
- जस्टीन लँगर यांना वाटेल की ‘खेळाडूंनी पाठीत वार केला’
- Taliban Crisis वर सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता
ह्या प्रकरणाची माहिती मिळताच जिवती पोलीसांनी जखमी झालेल्या नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीत 7 जण जखमी झाले असून जखमींमध्ये शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) यांचा समावेश आहे.
- पुण्यात बिर्याणीवरून राडा; हॉटेल मालकासह कामगारावर वार
- धर्मगुरू : तालिबान्यांना रोखा अन्यथा भारतासाठी धोका; शिया धर्मगुरूंचं वक्तव्य
पोलिस वेळीच गावात पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला असून पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी आरोपीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये सुग्रीव रामाराव शिंदे,दत्ता कांबळे,प्रकाश कोटंबे,बालाजी कांबळे,दादाराव कोटंबे,अमोल शिंदे,गोविंद संभाजी येरेकर,केशव श्रावण कांबळे,माधव तेलंगे,दत्ता शिवाजी भालेराव,सुरज कांबळे, सिध्देश्वर शिंदे, संतोष पांचाळ यांचा समावेश आहे.
पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती सहा पोलिस निरिक्षक संतोष अंबिके करित आहे.
नागारिकांनी कुठल्याही अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये
गावात सध्या शांततेच वातावरण आहे.तपासअंती निष्पन्न झालेल्या 13 जणांना ताब्यात घेतले आहे.उर्वरीत आरोपींसाठी तपास सुरू आहे. गावातील नागारिकांनी कुठल्याही अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये असे काही आढळून आल्यास पोलिसांना तातडीने कळवावे.
– सुशिलकुमार नायक, उपविभागिय पोलिस अधिकारी, गडचांदूर
हे ही वाचलत का :
- क्रीडा शिक्षक : २५०० विद्यार्थ्यांसाठी एक क्रीडा शिक्षक, ऑलिम्पिक पदके वाढणार कशी?
- Bollywood News : अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात
- श्रावण घेवडा-मटकीची भाजी कशी बनवाल?