ठाणे : गणेशोत्सवामुळे अखेर गणेश घाटाची स्वच्छता

ठाणे मनपाकडून दखल, बाप्पांच्या विसर्जनाचा निर्णय
ठाणे मनपा
ठाणे मनपाकडून देसाईतील वेताळ पाडा येथे असलेल्या गणेश घाटाची स्वच्छता करण्यात आली आहे.pudhari news network
Published on
Updated on

नेवाळी : गणपती विसर्जनासाठी गणेश घाटाची स्वच्छता न झाल्याने वेताळ पाडा ग्रामस्थ संतापले होते. ठाणे मनपाच्या दिवा प्रभाग क्षेत्र कार्यालयात यंदा बाप्पांचे विसर्जन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. या संदर्भातील वृत्त दैनिक पुढारीने प्रकाशित केल्यानंतर ठाणे मनपाकडून देसाईतील वेताळ पाडा येथे असलेल्या गणेश घाटाची स्वच्छता करून दिली आहे.

ठाण्यातील दिव्यात महानगरपालिका नागरिक सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. नागरिकांना आवश्यक सुविधांसाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. कल्याण शिळ रस्त्यावरील देसाई मधील वेताळ पाडा येथे गणेश घाट आहे.परंतु या गणेश घाटात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आणि गटाराच पाणी साचलेले होते.

ठाणे मनपा या प्रकाराकडे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आले आहेत. अशाताच प्रशासन तलावाच्या स्वच्छतेकडे काणाडोळा करत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.यंदा थेट दिवा प्रभाग क्षेत्र कार्यालयात गणपती विसर्जन करण्याची घोषणा ग्रामस्थांनी केली होती.

ठाणे मनपा
दैनिक पुढारीने प्रकाशित केलेले वृत्तpudhari news network

दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणारे देसाई गाव हे सात पाड्यांचे सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते.मात्र अने क दिवसांपासून आवश्यक मुलभूत गरजांकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे आक्रम पवित्र घेत यंदा बाप्पांचे विर्सजन दिवा प्रभाग समिती कार्यालयात करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र या संदर्भातील वृत्त दैनिक पुढारी ने प्रकाशित केल्या नंतर ठाणे महानगर पालिकेच्या वतीने वेताळ पाडा येथील ग्रामस्थांची समस्या सोडवली आहे. त्यामुळे स्वच्छ झालेल्या गणेश घाटात विसर्जन करण्याचा निर्णय आता ग्रामस्थांनी घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news