या संदर्भात दै. 'पुढारी'त सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून वन विभागाचा भोंगळ कारभार उघड केला होता. अखेर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या वृत्ताची दखल घेतल्याने त्यांनी तालुका वन अधिकारी आणि कर्मचार्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वनपाल रवी मगर, वनरक्षक भाऊ जाधव, बापू झडगे, निखिल गुंड, किरण कदम आदी वन अधिकार्यांनी बुधवारी (दि. 17) मलठण, राजेगाव, वाटलुज, नायगाव या भागातील वन विभागाच्या क्षेत्रातील बेकायदा वृक्षतोड केलेली झाडांची लाकडे जप्त करून ती ट्रॅक्टरमध्ये भरून ताब्यात घेतली. तसेच या ठिकाणी असलेल्या पाच ते सहा कोळसा खाणी जाळून उद्ध्वस्त करीत त्या जागीच नष्ट करून कारवाई केली. वन क्षेत्रातील बेकायदा वृक्षतोड केलेली लाकडे जप्त करण्याचे काम सुरू असून, संबंधित वृक्षतोड करणार्यांवर तसेच कोळसा खाणी मालक व चालक यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत वन विभागाने दिले आहेत.