वडगाव शेरीत विजेचा लपंडाव; गैरसोयीने नागरिक त्रस्त | पुढारी

वडगाव शेरीत विजेचा लपंडाव; गैरसोयीने नागरिक त्रस्त

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा : वडगाव शेरीतील हरिनगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. हरिनगर परिसरामध्ये गेल्या चार दिवसामध्ये वारंवार वीपुरवठा खंडित होत आहे. दररोज सकाळी काही काळासाठी वीजपुरवठा खंडित होतो. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सकाळी सकाळी नागरिकांचे काम होत नाही. व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

हरिनगर येथील स्थानिक नागरिक सुधीर गलांडे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्या पासून दररोज सकाळी 6 ते 9 दरम्यान वीजपुरवठा खंडित होत आहे. गुरुवारी वारंवार वीजरपुरवठा खंडित होत होता. यामुळे नागरिकांना काम करताना अडचणी येत आहेत. महावितरण विभागाने या भागासाठी अघोषित भार नियमन सुरू केले आहे. ऑनलाइन तक्रारीचा काहीच उपयोग होत नाही. महावितरणचे अधिकारी कांबळे यांनी सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठ्याबाबत काही समस्या होत्या. आज एका डीपीचे काम केले आहे. भविष्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल.

Back to top button