राजगुरुनगर : सर्पदंशाने शेतकर्‍याचा मृत्यू | पुढारी

राजगुरुनगर : सर्पदंशाने शेतकर्‍याचा मृत्यू

राजगुरुनगर : सोयाबीनला पाणी भरण्यासाठी शेतातील विद्युत मोटार चालू करायला गेल्यावर सर्पदंश होऊन शेतकर्‍याचा मृत्यू झाला. राहुल प्रकाश डांगले (वय 35, रा. डांगले शिवार, कडूस, ता. खेड) असे शेतकर्‍याचे नाव आहे. सोमवारी (दि. 29) सकाळी सातच्या सुमाराला राहुल डांगले मोटार चालू करायला गेले होते.

त्या वेळी मोटारीच्या लाकडी खोक्यात असलेल्या सापाने त्यांना दंश केला होता. चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पुढे रस्त्यात राहुल मयत झाले. चाकण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Back to top button