खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा 99 टक्क्यांवर

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा 99 टक्क्यांवर
Published on
Updated on

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा 99 टक्क्यांवर पोचला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. या चारही धरणांतून पुणे शहर आणि जिल्ह्यातील इंदापूर, बारामती (काही भाग), दौंड, हवेली या तालुक्यांंना शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो.

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत 13 हजार 981 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत, तर टेमघर धरण 93 टक्के भरले आहे. चारही धरणांमध्ये 28.92 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी जमा झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news