पुणे : राज्य सरकार गोंधळलेल्या स्थितीत; खा. सुप्रिया सुळे यांची टीका
पुणे; पुढारी वृत्तसेवा: आपत्कालीन परिस्थितीमध्ये पालकमंत्री नाहीत. कोणी माईक ओढून घेते, तर कोणी चिठ्ठ्या देते, त्यामुळे सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खा. सुळे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन पुणे शहरातील खड्डे, स्वारगेट-कात्रज प्रस्तावित मेट्रो प्रकल्प, समाविष्ट गावांमधील कचरा, पाणी प्रश्न आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल या विषयांवर चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.