Nashik : वर्हाडाच्या बसला अपघात, दोन ठार; 15 महिला जखमी
मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव तालुक्यातील चिंचवेहून साक्रीकडे जाणारी वर्हाडाची बस उलटून झालेल्या अपघातात एका महिलेसह एक बालिका ठार झाली तर 15 महिला जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. शाळेच्या बसमध्ये सदर वर्हाड साक्रीकडे जात असताना भडगाव बारीमध्ये ही बस उलटून हा अपघात झाला. गाडीचा बेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
चिंचवे येथील संदिप बाळू साळवे यांच्या मुलीचा विवाह साक्रीत येथील राजे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी तालुक्यातीलच एका शाळेच्या बसमध्ये (एमएच 41 एजी 9805) मुलीकडील वर्हाड लग्नासाठी निघाले. ही बस भडगाव बारीमध्ये आली असता गाडीचा बेक फेल झाल्याने बस उलटली. या अपघातामध्ये मखमलाबाई बारकू ह्याळीज (60, करंजगव्हाण) व मयुरी विकास बोरसे (11, कोपरगाव) हे मयत झाले असून 15 वर्हाडी महिला जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये पुनम किरण पाटील (10, सुरत), श्रद्धा किरण पाटील (13, सुरत), मीराबाई विकास बोरसे (36, शिर्डी), निकिता चेतन साळवे (25, चिंचवे), चित्राबाई गुलाब साळवे (55, चिंचवे), मंगलाबाई शिवाजी देवरे (50, चिंचवे), शंकर चंदू पवार (59, चिंचवे), ज्योती किरण पाटील (40, सुरत), लावण्या रवींद्र चव्हाण (9, चिंचवे), रविना समाधान साळवे (20, चिंचवे), गायत्री ज्ञानेश्वर साळवे (14, चिंचवे), बापू विठ्ठल साळवे (60, चिंचवे), सुमनबाई हिरामन खैरनार (68, चिंचवे), सुवर्णा मधुकर जावळे (40, चिंचवे), मंगलबाई बापू साळवे (48, चिंचवे) यांचा समावेश आहे.