माझी तुझी रेशीमगाठ मालिका संकर्षण कऱ्हाडे खरंच सोडणार का? | पुढारी

माझी तुझी रेशीमगाठ मालिका संकर्षण कऱ्हाडे खरंच सोडणार का?

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. प्रोमोज रिलीज झाल्यापासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे देखील या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याची गेल्या काही दिवसांपासून ही मालिका सोडल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याने खरंच ही मालिका सोडली आहे कि ही फक्त अफवा आहे यावर चाहते संभ्रमात आहेत. मात्र ही शंका आता दूर झाली आहे. कारण संकर्षण ही मालिका सोडणार नसून यातून काही काळाचा ब्रेक घेणार आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील संकर्षण सकारात असलेलं ‘समीर’ हे पात्र फार गाजत आहे. असे असताना अभिनेता ही मालिका सोडणार असल्याचे कानी पडताच अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, अभिनेता काहीकाळ ब्रेक घेत असल्याचे कळल्यावर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्मान झाले आहे.

संकर्षण कऱ्हाडेनं स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना याचं उत्तरं दिलं आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, ‘मला न विचारता, माझ्याशी काहीही न बोलता मी मालिका सोडणार असल्याची अफवा काहींनी पसरवली आहे. मात्र ही खोटी अफवा फसरवली आहे. मी ही मालिका कधीच सोडणार नाही. माझं माझ्या कामावर आणि प्रेक्षकांच्या प्रेमावर प्रचंड विश्वास आहे.

तब्बल दोन वर्षानंतर नाट्यगृह खुली होणार आहेत. याच निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा नाटकं पाहायला मिळणार आहेत. यामध्येच संकर्षण अभिनित ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांची वाहवा मिळवत होतं. आता हेच नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाटकांचे प्रयोग सुरु होणार असल्याने संकर्षणला मालिकेसाठी वेळ देता येणार नाहीये. म्हणूनच तो काही काळासाठी अर्थात नाटकांच्या प्रयोगासाठी मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे कळते आहे.

काही दिवसांपूर्वी झी मराठीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका आपल्या भेटीला आली आहे. मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मालिकेत अभिनेता यश अर्थातच श्रेयश तळपदेच्या मित्राची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं साकारली आहे. या दोघांमध्ये फारच सुंदर बॉन्डिंग दाखवण्यात आलं आहे.

यशचा मित्र समीर म्हणजेच संकर्षण प्रत्येक पाऊलावर एखाद्या सावलीप्रमाणे त्याची साथ देत असतो. दोघे भांडतात, चेष्टा मस्करी करतात, एकमेकांची खिल्ली उडवतात मात्र एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत असं हे नातं रेखाटण्यात आलं आहे. या दोघांची मैत्री रसिक प्रेक्षकांना फारच आवडत आहे.

Back to top button