मुंबई महापालिका निवडणुकीत आडवं केल्याशिवाय राहणार नाही : आशिष शेलार | पुढारी

मुंबई महापालिका निवडणुकीत आडवं केल्याशिवाय राहणार नाही : आशिष शेलार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपसाठी मुंबई महापालिका विजयाचे चित्र स्पष्ट झाले. आता तुम्ही एकत्र आलात तरी जिंकू शकणार नाही. या निवडणुकीत मुंबईकरांच्या सुविधेसाठी आडवं केल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी विरोधकांना दिले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अधोगतीचा रोज नवा अध्याय दाखवत आहे. आदित्य ठाकरेंना दुसरा पर्याय नाही. स्वबळावर लढता येत नाही, प्रचार करता येत नाही. स्वपक्षाचे बळ कमजोर झाल्याने अन्य पक्षाच्या बळावर चालण्याशिवाय त्यांना पर्याय नाही.

उद्धव ठाकरे मतासाठी खोट बोलले. त्यानंतर सत्तेसाठी विश्वासघात केला. मते आणि सत्ता महापलिकेत मिळविण्यासाठी लांगुलचालन आणि तुष्टीकरण हा रस्ता अवलंबला. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. सत्ता मिळविण्याची स्पर्धा उद्धव बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button