बारावीचा निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात : वर्षा गायकवाड | पुढारी

बारावीचा निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात : वर्षा गायकवाड

मुंबई , पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता असलेल्या बारावीचा निकाल येत्या पंधरा दिवसात जाहीर केला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल पंधरा दिवसांच्या आत लागेल, असेही त्यांनी सांगितले. शिर्डी येथे आयोजित केलेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात मला अनेक पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारणा झाली आहे. मी त्या पालक आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की, पुढील आठवड्यात १२ वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल.
कोरोनाच्या नंतर म्हणजे दोन वर्षांनी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षा पार पडल्या आहेत. त्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांसाठी विशेष असणार आहे. दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याबाबत संबंधित बोर्डांना सूचना दिल्या आहेत, असेही शालेय शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचलतं का?

Back to top button