जालना : चाकूने वार करून खून
जालना; पुढारी वृत्तसेवा : अंबड येथील होळकर नगरात राहणार्या राजेंद्र विठ्ठल भोरे (40)याचा अनैतिक संबंधातून संशयित आरोपी पाराजी गहिनाजी दिवटे याने चाकूने पोटावर वार करून खून केल्याची घटना सोमवार (24)रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत नीता राजेंद्र भोरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे पती राजेंद्र हे सोमवारी सकाळी फिरावयास गेले असता पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्यांच्यावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक हुंबे, यांनी घटनास्थळी भेट दिली.