बीड : कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

आष्टी (बीड) : येथून जवळ असलेल्या धामणगाव घाटात एका कारला झालेल्या अपघातात बीडच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.11) सायंकाळी घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगाव घाटात त्यांची कार रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला.
टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बीड येथील टेकवाणी यांच्या निवासस्थानी नातेवाईक व मित्रमंडळींनी गर्दी केली होती.
नातू दे किंवा ५ कोटी दे ; थेट आई-वडिलांनी अमेरिकेत असलेल्या मुलावर ठोकली केस ! https://t.co/RZTMPvzpCU #pudhari #marathinews #latestnews
— Pudhari (@pudharionline) May 11, 2022