काटामारी करून कारखानदारांनी 4581 कोटींचा दरोडा टाकला : राजू शेट्टी | पुढारी

काटामारी करून कारखानदारांनी 4581 कोटींचा दरोडा टाकला : राजू शेट्टी

जयसिंगपुर : पुढारी वृत्तसेवा : उसात काटामारी करून कारखानदारांनी 4 हजार 581 कोटी रुपयांचा दरोडा टाकला आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने राजरोसपणे सरासरी वजनाच्या 10 टक्के काटा मारतात. मागच्या हंगामात महाराष्ट्रात 13 कोटी 20 लाख टन उसाचे गाळप झाले. म्हणजेच काटा मारून 1 कोटी 32 लाख टन उसाची चोरी असल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी माजी खासदार राजू शेट्टी साखर काटामारीच्या मुद्द्यावरून कारखानदारांवर आरोप केला आहे.

शेट्टी म्हणाले, सक्षम अधिकार्‍यांकडून ओटीपी घेतल्याशिवाय तलाठ्याला 7/12 नोंदी करता येत नाहीत. ऑईल कंपनीने परवानगी दिल्याशिवाय पेट्रोल पंपचालकाला पेट्रोल मोजमाप करणार्‍या यंत्राशी छेडछाड करता येत नाही. मग साखर आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला वजन काट्याशी छेडछाड करता येणार नाही, असा आदेश का निघत नाही?

राज्यातील साखर कारखाने हे सरासरी वजनाच्या 10 टक्के काटा मारतात. गेल्या हंगामात महाराष्ट्रात 13 कोटी 20 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये राज्याची सरासरी रिकव्हरी ही 11.20 आहे. म्हणजेच 14.78 लाख टन एवढ्या साखरेची चोरी झाल्याचा आरोप करीत साखर किरकोळ किराणा दुकान, मिठाईवाले, शीतपेय कंपन्यास विना पावतीची विक्री केली जाते.

सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे याची किंमत 4 हजार 581 कोटी रुपये होते. तर, यामधून शासनास मिळणार्‍या जीएसटी रुपातील कर हा 229 कोटी रुपये होतो. किरकोळ व्यापार्‍यांवर धाडी टाकणारे जीएसटीचे खाते का गप्प आहे? असा सवालही राजू शेट्टींनी केला आहे.

Back to top button