राज्यातील एमआयडीसींमध्ये ‘एअर मॉनिटरिंग सिस्टीम’ बसविणार : सुभाष देसाई | पुढारी

राज्यातील एमआयडीसींमध्ये ‘एअर मॉनिटरिंग सिस्टीम’ बसविणार : सुभाष देसाई

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा  लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या द़ृष्टीने येथे कार्यान्वित करण्यात आलेली हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणा नक्कीच उपयुक्त सिद्ध होईल. त्यामुळे येथे प्रथमच केलेला प्रयोग या पुढच्या काळात करून राज्यातील एमआयडीसींमध्ये अशी यंत्रणा बसविण्यात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लोटे येथे जाहीर केले. त्यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्घाटन झाले.

यावेळी आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, सीईटीपीचे चेअरमन डॉ. सतीश वाघ, सीईटीपीचे व्हाईस चेअरमन महादेव महिमान, अधीक्षक अभियंता वानखडे, लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके, घाणेखुंट येथील सरपंच अंकुश काते, प्रशांत पटवर्धन, तसेच उद्योजक व मान्यवर उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये बसविण्यात आलेल्या या यंत्रणेमध्ये प्रत्येक दहा मिनिटांनी हवेचा दर्जा तपासून वाचन होणार आहे.

ही यंत्रणा मुंबई येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आलेली असल्यामुळे रिडिंगमध्ये कोणतेही गैर आढळल्यास संबंधितांना जाब विचारला जाईल व संबंधितांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच प्रदूषणाचे नियंत्रण सांभाळण्यासाठी ही यंत्रणा नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ना. देसाई पुढे म्हणाले की, या परिसरातील जनतेने येथे औद्योगिक क्षेत्रासाठी जागा उपलब्ध करून दिली असून त्यांना चांगली हवा व पाणी मिळाली पाहिजे, ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र, औद्योगिक क्षेत्र लोटे यांनी हा चांगला उपक्रम राबविला असून अशा प्रकारची यंत्रणा राज्यामध्ये इतर सर्वत्र राबविण्याबाबत निर्देश देण्यात येतील.

सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्या मार्फत करण्यात येणार्‍या मदतीबाबत या वेळी मंत्री महोदयांनी कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते टु-वे स्कँडा ऑटोमॅटिक सिस्टीमचे लॅपटॉपच्या सहाय्याने डेमो प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच संस्थेच्या माध्यमातून गोवळकोट – भोईवाडा येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्यांना त्यांच्या हस्ते मदतही देण्यात आली.

या वेळी आ. भास्कर जाधव म्हणाले की, आम्ही विकासाच्या बाजूने आहोत, त्यामुळे आमचा उद्योजकांना त्रास नाही. मात्र, नोकरीत स्थानिकांना न्याय द्यायला हवा तर मार्गताम्हाणे एमआयडीसी व्हावी, अशी आता स्थानिकांची मागणी आहे, असे सूचित केले. आ. शेखर निकम यांनी येथे नवीन उद्योग यावेत. त्यासाठी आंम्ही सहकार्य करू असे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. सतीश वाघ यांनी सीईटीपीने सुरु केलेल्या यंत्रणेची माहितो देऊन येथील जल व वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना बाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध कंपन्यांचे अधिकारी, लोटे, असगणी, घाणेखुंट, सोनगाव आदी भागातील

Back to top button