औरंगाबाद : विषारी साप चावल्याने विवाहितेचा मॄत्यू
हतनूर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील हतनूर येथील शेतातील जगताप वस्ती येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय विवाहितेस सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. कावेरी संताजी जगताप असे विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी (दि २६) रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री कुटुंबाचे जेवन झाल्यानंतर भांडी धुण्यासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी कावेरी या घराशेजारी असलेल्या हौदाजवळ गेल्या होत्या. यावेळी अंधारात विषारी सापाने त्यांना चावले त्यानंतर कावेरी यांनी मला काहीतरी चावले आहे असे सांगितले. दरम्यान त्या चक्कर येवून पडल्या. दरम्यान त्यांना तातडीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कावेरी यांचा पश्चात दोन महिन्याची मुलगी, पती, सासू, सासरे, पुतणी असा परिवार आहे.
हेही वाचा