

मुंबई : Maharashtra Assembly Poll । महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची ३० ऑक्टोबर रोजी छाननी केली झाली. २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९६७ उमेदवारांपैकी ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.