विधान परिषद निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे; बाळासाहेब थोरात | पुढारी

विधान परिषद निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे; बाळासाहेब थोरात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : नाशिक विधान परिषद निवडणूकीच्या वेळी खूप राजकारण झाले. ते पक्षीय राजकारण झाले आहे त्या बाबतच्या मी भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत त्यातून मी आणि वरिष्ठ व्यवस्थित मार्ग काढू त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही मात्र जे राजकारण महिन्या भरात झाले ते मला व्यथित करणारे झाले असल्याची खंत काँग्रेस विधिमंडळपक्षाचे नेते, माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली

आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.०५) शहरातील‎ जाणता राजा मैदान येथे आनंद,‎ मिलिंद, आदर्श व उत्कर्ष शिंदे‎ यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही‎ बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले होते. त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने आमदार थोरात यांनी संवाद साधला. ते म्हणाले, हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर फार बोलले पाहिजे असे नाही, या मताचा मी कायम आहे. म्हणून त्याबाबत काय आहे. ते मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय आणि जे काही करायचे ते योग्य पद्धतीने करू. त्याबाबत आपण काही काळजी करण्याचे कारण आहे, असे मला वाटत नाही. त्यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळामध्ये विधान परिषदेचे राजकारण सुरू होते. त्यामध्ये काही बात म्या अशा आल्या की, भारतीय जनता पक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवले. एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचे वाटप सुद्धा करून टाकले. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. हे आपण पाहिलेले आहे. अनेक प्रकारच्या चर्चा त्यांनी घडवून आणलेल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत त्या विचाराने वाटचाल केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचाराने आपली राहणार आहे. यांची ग्वाही देतो. माझ्या मनातील भावना यानिमित्ताने मी बोलला आहे.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सतत संगमनेर तालुक्यावर सूड उगावावा अशा पद्धतीने हल्ले होताना दिसतात. अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला कसा देता येईल, असे पाहिले जाते आहे. त्यांना अडचणीत आणले जात आहे. त्यांचे उद्योग,व्यवसाय बंद पाडण्यापर्यंत गेले आहे. विकासाची चाललेली कामे बंद पाडण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो. खरं म्हणजे सत्ता, सत्ता बदल हे सर्वच पाहिलेले आहे. सत्तेत आपणही राहिलो आहे. परंतू दुर्देवाने हा अनुभव यावेळेस आपण यावेळेस घेतो आहे. परंतु संगमनेर तालुक्याने कायमच संघर्ष केला आहे. संघर्षातून आपण मोठे झालो आहे. निळवंडेकरिता केलेलासंघर्ष, असेल नदीच्या पाण्याचा वाटा मिळण्या करिता केलेला संघर्ष असेल. प्रत्येक गोष्टी तून संघर्षातून आपण यश मिळवि लेले आहे आणि पुढे गेलो आहे. या संघर्षातून आपण बाहेर येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Back to top button