सामान्यांसाठी लढणारा नेता हरपला – उपमुख्यमंत्री फडणवीस

सामान्यांसाठी लढणारा नेता हरपला – उपमुख्यमंत्री फडणवीस
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : विनायक मेटे यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना असून ही एक मोठी क्षति आहे. मराठा समाजाची कधीही न भरून निघणारी हानी आहे. ते सामांन्यासाठी लढणारे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने आज सामान्यांसाठी लढणारा नेता हरपला आहे. ही राजकारणात कधीही भरून न निघणारी हानी आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

विनायक मेटे यांचे आज सकाळी सहाच्या सुमारास अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचे निधन झाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तसेच मी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आहे. असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news