नगर : कुठे पिकांचं…. तर कुठे देवीच्या चौथऱ्याचं नुकसान…गॅस  पाईपलाईनविरोधात ग्रामस्थांचा संताप | पुढारी

नगर : कुठे पिकांचं.... तर कुठे देवीच्या चौथऱ्याचं नुकसान...गॅस  पाईपलाईनविरोधात ग्रामस्थांचा संताप

जेऊर : पुढारी वृत्तसेवा

नगर-औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाइपलाईन कामाच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात जेऊर व इमामपूर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जेऊर व इमामपूर ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. नगर-औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेलले गॅस पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू आहे.

काम करताना कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांमधून काम करत मोठे नुकसान करण्यात आलेले आहे. तसेच, शेतकर्‍यांच्या मोठमोठ्या फळझाडांची कत्तल करण्यात आली आहे. व्यावसायिकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे. दुकाने, हॉटेल व इतर दुकानांसमोर दोन-तीन महिन्यांपासून चर खोदून ठेवल्याने व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. गॅस पाईपलाईनच्या नियोजनशून्य कामामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील घडलेले आहेत.

देशातील सक्रिय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; दिवसभरात २ हजार ६८५ कोरोनाबाधितांची भर

इमामपूर येथील धार्मिक स्थळ बोराई मातेच्या चौथर्‍याचे नुकसान करून धार्मिक भावना दुखावण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आलेले आहे. तसेच, इमामपूर येथील महेश राधाकिसन आवारे यांच्या उसाच्या रसवंतीगृहाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान करण्यात आलेले आहे. संबंधित ठेकेदार हा शेतकरी व व्यावसायिक यांच्याशी अरेरावी करत आहे.

त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरुद्ध झालेल्या नुकसानीबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करावा. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या बाबतीतही मृत्यूस कारणीभूत झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, परिसरातील शेतकरी, व्यावसायिकांना झालेली नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा, ग्रामस्थ परिसरात काम सुरू होऊ देणार नाहीत, असा इशारा जेऊर व इमामपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच भीमराज मोकाटे, उपसरपंच श्रीतेश पवार यांनी दिला आहे.

Menstrual Hygiene Day: २८ मे राेजीच का साजरा करतात मासिक पाळी स्वच्छता दिन? 

..तर अनुचित प्रकार घडू शकतो
गॅस पाईपलाईनसाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विद्युतलाईन अनेक ठिकाणी शिफ्ट करण्यात आली आहे. गॅस पाईपलाईनच्या कामास तात्काळ परवानगी देणारे अधिकारी शेतकर्‍यांबाबत उदासीन का असतात? संबंधित ठेकेदाराच्या मनमानी विरोधात पंचक्रोशीत संताप निर्माण झाला असून, शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यातून अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी, असे जेऊरचे उपसरपंच श्रीतेश पवार यांनी म्हटले आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालावे
गॅस पाईपलाइनच्या कामामुळे शेतकरी, व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याविरोधात आवाज उठवून देखील ठेकेदारावर काही कारवाई अथवा समज देण्यात आलेली नाही. त्यामुळे ठेकेदाराची मनमानी वाढतच आहे. शेतकरी, व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या प्रश्नाकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास हे प्रकरण चांगलेच चिघळण्याची शक्यता आहे.

सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडेंच्या बंगल्यातून १३ लाखांचे दागिने चोरीला

Back to top button