सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारे कास धरण भरले आहे. वर्षभर तहान भागवणारे धरण भरून वाहू लागल्याने कृतज्ञता म्हणून महिलांनी साडी, खण आणि नारळाने धरणाचे ओटी भरण करण्यात आले.
कास धरण दोन दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाले असून धरणात सध्या 0.03 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण भरल्यामुळे सातारकरांचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे. कास धरणाच्या सांडव्यावरील पायऱ्यांवरून पडणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटक गर्दी करू लागले आहेत. वर्षभर सातारकरांची तहान भागवणारे कास धरण भरून वाहू लागल्याने कृतज्ञता म्हणून ओटी भरण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा कार्यक्रम घेण्यात आला नव्हता. या कार्यक्रमाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आवर्जून उपस्थित असतात. पण यावेळी उदयनराजे भोसले संसदीय कामकाजानिमित्त दिल्लीत असल्यामुळे कार्यक्रमास ते उपस्थित नव्हते. यावेळी पालिकेच्या सातारा विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. उपस्थित महिलांच्या हस्ते साडी,खण आणि नारळाने ओटी भरण करण्यात आले.
हेही वाचा :