जिल्ह्यातील नागभीड ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, सावली, गोंडपिपरी, चिमूर, चंद्रपूर तालुक्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्यस्थितीत धान शेवटच्या टप्प्यात म्हणजे कापणी व बांधणीचा हंगाम सुरू आहे. मध्यम स्वरूपाची धानपीक काढून झाले आहे. तर जड स्वरूपाच्या पिकांची कापणी व बांधणी सुरू आहे. ठिकठिकाणी कळपा बाध्यांमध्येच पडून आहेत. सोबतच रब्बी पिकांमध्ये चना, जवस, गहू, तूर पिकाची काही ठिकाणी लागवड झाली आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. ह्या दोन्ही पिकांवर अवकाळी पावसाचे संकट आहे.