कोल्हापूर : दोन महिलांसह तिघांचा उष्माघाताने मृत्यू

कोल्हापूर : दोन महिलांसह तिघांचा उष्माघाताने मृत्यू
Published on
Updated on

केंबळी, पुढारी वृत्तसेवा : बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे सोमवारी एकाच दिवसात दोन महिला व आणखी एका व्यक्तीचा अशा एकूण तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

सौ. साताबाई शिवाजी पाटील (वय 54) या सोमवारी सकाळी शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेल्या होत्या. दुपारी बारा वाजता हवेत उष्मा वाढल्याने त्या घरी आल्या. तहान लागल्याने त्या पाणी प्यायल्या. नंतर क्षणार्धात चक्कर येऊन कोसळल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबाचा आक्रोश मन हेलावणारा होता. त्यांच्या मागे पती एक मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे असा हा परिवार आहे.

सातापा भाऊ पाटील (52) हे शेतकरी दोन दिवसापूर्वी उष्म्याने अस्वस्थ वाटल्याने कोल्हापुरात उपचारासाठी दाखल झाले. त्यांचेही सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जनाबाई विठ्ठल कांबळे (80) या वृद्धेलाही धाप वाढल्याने चार दिवसांपूर्वी उपचारासाठी कोल्हापूरला दाखल करण्यात आले होते. त्यांचाही सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एकाच दिवसात उष्माघाताने दोन महिलांसह एकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news