रोहित हेगडे, पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. एकाच प्रकारे आणि एकच पीक सातत्याने घेतल्याने उत्पन्नात वाढ होत नाही व शेतीस ही नुससान होते. काही शेतकर्यांनी निर्धार केला तर ते विविध कृषी पद्धतींना आपले उत्पन्न वाढवण्याचे साधन बनवू शकतो. असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे. नवीन तंत्रज्ञानान वापरून शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात वाढ केली पाहिजे. तर काही शेतकरी यामध्ये यशस्वी ही झाले आहेत. नवीन तंत्रज्ञानाने शेती करणे हे सायन्स नसून आपल्या जमिनीची सुपीकता ओळखून आणि पीक चक्र बदलून उत्पन्न सहज वाढवता येते.
सध्या शेतकरी हे पारंपारिक पद्धतीनेच शेती करत आहेत. या अंतर्गत शेतकरी फक्त गहू, हरभरा, मोहरी अशी कडधान्याचे पीक घेतात. तसेच कमी कालावधीत येणारी पीके सतत घेतात. यामूळे उत्पन्न ही मर्यादित राहते. तर आता शेतक-यांनी जुनी पद्धत न स्वीकारता आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी.
हे ही वाचलं का