पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा स्टार फलंदाजी विराट कोहली यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे. त्याने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्याने त्याला हा बहुमान मिळाला आहे. भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या विराटने ११ डावांमधील ९ डावांमध्ये किमान ५० धावांची संख्या पार केली आहे. (Player of the Tournament)
शिवाय, त्याने मास्टर ब्लास्टरचा विक्रमही मोडित काढला आहे. विराट एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू ठरला आहे. त्याने ७६५ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत ६७३ धावा केल्या होत्या. (Player of the Tournament)