महाराष्‍ट्रातल्‍या प्रकल्‍पांवर राज ठाकरे आणि राणे का बोलत नाहीत? : संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : नाश करणारे प्रकल्‍प महाराष्‍ट्रावर लादले गेले. कोकणातील प्रकल्‍प पळवून नेले. मात्र त्‍यावर राज ठाकरे आणि नारायण राणे काही बोलत नाहीत. जवानांवरील हल्‍ल्‍यांबाबत कोणी बोलत नाही. कोकणची परंपरा विनायक राउत पुढे नेतायत. त्‍यामुळे नाराण राणे यांचा पराभव होणार असल्‍याची टीका करत संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यावर हल्‍लाबोल केला.

नुकतीच राज ठाकरे यांची नारायण राणे यांच्यासाठी कोकणात सभा पार पडली होती. त्‍यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्‍यावर उत्‍तर देताना खासदार राऊत यांनी आज चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे हे नकली अंधभक्‍त असल्‍याची टीका करत राज ठाकरे हे महाराष्‍ट्राच्या प्रकल्‍पांवर का बोलत नाहीत? असा सवाल केला. तसेच अमित शहा यांच्यावर टीका करताना औरंगजेबाबाबत अमित शहांना प्रेम असल्‍याची टीका केली. नारायण राणेंवर टीकास्‍त्र सोडताना राणे यांचा या निवडणुकीत पराभव होणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news