पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरात येथे ॲग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमावेळी नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांनी मोठा सल्ला दिला. ते म्हणाले, शेतक-यांनी सरकारवर अवलंबून राहू नये, मी सरकारमध्ये आहे म्हणून सर्व शेतक-यांना सांगतोय. तर आमचं मार्केट आम्ही शोधले आहे, तर शेतक-यांनी आता त्यांच मार्केट शोधावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
विदर्भामधील फळे-भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयी कार्यक्रम आयोजित केला होता. गडकरी यांनी स्वतःच्या शेतातील भाजीपाल्यासाठी मार्केट शोधले आहे आणि त्यासाठी त्यांना कोणते प्रयत्न करावे लागले याचे उदाहरण शेतक-यांना दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, शेतक-यांनी सरकारच्या भरवश्यावर राहू नये, मी स्वत: सरकारमध्ये आहे. तसेच याबाबत उदाहरण देताना ते म्हणाले, लग्नानंतर नवविवाहितांनी जर काहीच प्रयत्न केले नाही तर घरी पाळणा हालणार नाही, असे गडकरी म्हणाले.
कृषी क्षेत्रात विकासासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा
शेतक-यांना जर कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यांनी स्वतःच पुढाकार घ्यावा. शेतक-यांनी सरकारच्या भरवश्यावर राहू नये. आता कृती करण्याची वेळ आली आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांची मोठी प्रगती झाली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्यायला हवा, असा सल्ला गडकरी यांनी यावेळी दिला.
हेही वाचा